मुंबई, ठाण्यात आजपासून चार दिवस मुसळधार

मुंबई, ठाण्यात उद्या सोमवारपासून गुरुवारपर्यंत चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यांमध्येही पुढील चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघरमध्ये आज आभाळ भरून अधूनमधून जोरदार सरी कोसळल्या. रविवार, गटारी आणि ढगाळ वातावरणामुळे मुंबईकरांनी घरीच राहणे पसंत केले. दरम्यान, मुंबईत आज दोन ठिकाणी फांद्या आणि झाडे पडण्याच्या घटना घडल्या तर एका ठिकाणी भिंत पडल्याची घटना घडली. एकूण 5 ठिकाणी शॉर्टसर्किट झाले, मात्र या सर्व घटनांमध्ये सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.