संविधान बदलणार नाही हे मोदींचे विधान फसवे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान बनवले हे भाजपला मान्य नाही म्हणून संविधान बदलण्याची भाषा भाजप नेते करत आहेत, असा आरोप काँग्रेस नेते, माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी आज केला.

पेंद्रात अटलबिहारी वाजपेयी सरकार असतानाही संविधान बदलण्याचा प्रयत्न झाला होता. भाजपचे खासदार अनंतकुमार हेगडे व पंतप्रधान मोदींचे आर्थिक सल्लागार विवेक देबरॉय यांनीही देशाला नवीन संविधानाची गरज आहे असे जाहीरपणे सांगितले आहे. आता संविधान बदलणार नाही असे नरेंद्र मोदी सातत्याने सांगत असले तरी ते फसवे आहे, असेही मुणगेकर म्हणाले.