मोदीजी, दहा वर्ष सेवा केलात आता तरी आमचा जीव सोडा, मार्कंडेय काटजू यांचा खोचक टोला

देशभरात सध्या लोकसभा निवडइणूकीची धामधूम सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरात सभा घेत आहेत. विरोधकांकडून नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायधीश मार्कंडेय काटजू यांनी शनिवारी ट्विटरवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.

”नारायण नारायण! आपण हिंदुस्तानी इतके कृतघ्न आहेत की ज्या विश्वगुरुंनी त्यांना आकाशापर्यंत पोहोचवलं, 15 लाख रुपये दिले त्यालाच हे चार जून रोजी चपला मारून बाहेर हाकलून देणार आहेत. कलयुग आले आहे, अशी खोचक पोस्ट त्यांनी ट्विटरवर शेअर केली आहे.

या पोस्टसोबत त्यांनी आणखी एक ट्विट करत मोदींना टोला लगावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना भारतरत्न द्यायला हवा व त्यानंतर त्यांनी त्यांच्या पापांचे प्रायश्चित्त करण्यासाठी हिमालयात जायला हवे. यामुळे त्यांच्या स्वाभिमानालाही ठेच लागणार नाही आणि देशाला देखील त्यांच्यापासून मुक्ती मिळेल, अशी पोस्ट मार्केंडेय काटजू यांनी शेअर केली आहे.