सरडा उगाच बदनाम आहे, रंग बदलण्याच्या वेगासाठी पलटी कुमारांना ‘गिरगीट रत्न’ द्यायला हवे – तेज प्रताप

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राष्ट्रीय जनता दलापासून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन पलटी मारली. त्यानंतर नितीश कुमारांनी भाजपसोबत हातमिळवणी करत काही तासातच बिहारमध्ये पुन्हा सत्ता स्थापन केली. नितीश कुमार यांच्या या ‘पलटू’ राजकारणावरून सध्या त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.

राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेज प्रताप यादव यांनी ट्विटरवरून एक पोस्ट शेअर करत अप्रत्यक्षरित्या नितीश कुमार यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी या पोस्टमध्ये नितीश कुमार यांना रंग बदलणारा सरडा म्हटले आहे. ”सरड तर उगाच बदनाम आहे. रंग बदलण्याच्या वेगासाठी तर पलटी कुमारांना ”गिरहीट रत्न’ पुरस्काराने सन्मानित करायला हवे’, अशी टीका तेज प्रतापने केली आहे. तसेच त्यांनी आणखी एक ट्विट करत ‘तुमच्या 17 वर्षांवर आमचे 17 महिने भारी राहिले’, असा टोला नितीश कुमारांना लगावला.