महाराष्ट्रात येणार उष्णतेची लाट; पारा 40 अंशांवर जाणार, हवामान खात्याचा अलर्ट

राज्यासह देशातील हवामानात मोठे बदल होत आहेत. राज्यात काही ठिकाणी पारा 40 अंशांच्या वर गेला आहे. तर काही ठिकाणी मेघगर्जानेसह अवकाळी पाऊस पडत आहे. राज्यात अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. आता देशातील काही भागासाह राज्यातही उष्णतेच्या लाटेचा अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात आता तापमानात मोठी वाढ होत असून आणखी आठवडाभर वातावरण आणखी तापण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

राज्यात पुढील 24 तासांसाठी विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता आहे. तसेच काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई आणि कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर कोकणाला उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसापासून मुंबई आणि ठाण्यात तापमानात प्रंचड वाढ झाली आहे. उष्णतेने अंगाची लाहीलाही होत आहे. तर वाढत्या उन्हामुळे अंगातून घामाच्या धारा निघत आहेत. पुढाल 24 तासांसाठी ठाणे, मुंबई, रायगडसाठी उष्णतेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पुढील 24 तासात उन्हाचा तडाखा आणखी वाढणार असून नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच कोकण, ठाणे, मुंबई येथे तापमानाचा पार 40 अंशापर्यंत जाण्याची शक्यता आहे. तर काही जिल्ह्यात तापमान 40 अंशांच्या वर जाणार आहे. मुंहई, कोकण, ठाणे आणि मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.तर विदर्भ आणि मराठवाड्यात हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.