आमचे रक्त घ्या अन् गहू, तांदूळ, तेल द्या! हिंगोलीतील शेतकऱ्यांकडून मिंधे सरकारचा निषेध 

पीक विम्याचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे आता उरलेसुरले आमचे रक्त घ्या अन् खायला गहू, तांदूळ, तेल द्या, असा आक्रोश करून हिंगोलीच्या गोरेगाव येथील शेतकऱयांनी राज्याच्या मिंधे सरकारचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या संतापजनक मागणीचे पत्रक पीक विम्याच्या निवेदनासोबत मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात आले आहे.

हिंगोली जिह्यातील 5 लाखांहून अधिक शेतकऱयांना पीक विम्याचा लाभ मिळालाच नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अशात आज सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील शेतकऱयांनी पीक विम्यासह विविध मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने मिंधे सरकारवर तीव्र संताप व्यक्त केला.

शेतकऱयांना पीक विम्याचा लाभ देण्यात यावा, यासह विविध मागण्यांसाठी सरकारने आमच्या शरीरातील रक्त घ्यावे अन् आम्हाला 10 किलो गहू, 5 किलो तांदूळ व 1 किलो गोडे तेल द्यावे, अशा आशयाचे पत्रक लावून मिंधे सरकारचा निषेध करून शेतकऱयांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठकले. या निवेदनाकर शेतकरी गजानन काकरखे, नामदेक पतंगे, प्रवीण मते, विजय काकरखे, राहुल काकरखे, संजय मुळे व सतीश वैद्य आदींच्या स्काक्षऱया आहेत.

अवयव विक्रीला काढले तरी सरकार ढिम्म

जिह्यात गतवर्षी खरीप हंगामात 3 लाख 26 हजार हेक्टरकरील पिकांचे नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त शेतकऱयांना 25 टक्के नुकसानभरपाई देण्यासाठी सुमारे 172 कोटींचा प्रस्ताक शासनाकडे पाठविण्यात आला होता. मात्र केंद्र सरकारच्या तांत्रिक समितीने हा प्रस्ताक नाकारल्यामुळे जिह्यातील 5 लाख 12 हजार 439 शेतकरी पीक विम्याच्या लाभापासून वंचित राहिले. गोरेगाव येथील शेतकऱयांनी काही दिवसांपासून पीक विम्यासाठी अनेक आंदोलने केली. बँकेचे कर्ज फेडण्यासाठी 10 शेतकऱयांनी स्कत:चे अवयव विक्रीला काढले होते. तरीही मिंधे सरकारने शेतकऱयांच्या या मागण्यांकडे दुर्लक्ष केले.

आमदार मुटकुळे शेतकऱयांना कधी भेटणार?

पीक विम्यासाठी गोरेगाव येथील कर्जबाजारी शेतकरी काही दिवसांपासून आंदोलन करत असताना भाजप आमदार तानाजी मुटकुळे इतर कामांचे उद्घाटन करण्यासाठी येत आहेत. मात्र आंदोलन करणाऱया शेतकऱयांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी येत नाहीत. आम्ही शेतकरी त्यांना 15 टक्के कमिशन देऊ शकत नाहीत. त्यामुळे आमदार मुटकुळे यांनी जिह्यातील पीक विम्याचे काय झाले? यासह वन्यप्राणी बंदोबस्ताचे काय? सोयाबीन व कापूस भाव वाढीचे काय? अतिकृष्टीच्या अनुदानाचे काय? शेतकरी आत्महत्येचे काय? शेतकरी कर्जमाफीचे काय? या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, असे गोरेगाव येथील शेतकरी गजानन काकरखे म्हणाले.