वसईत शिवसेनेच्या कामगार मेळाव्यात निर्धार; पालघरमधून भारती कामडी विजयी होणारच !

विरोधकांनी आचारसंहितेचा कितीही बागुलबुवा केला तरी पालघर लोकसभा मतदारसंघातील शिवसेना इंडिया आघाडीच्या उमेदवार भारती कामडी विजयी होणारच, असा विश्वास कामगार मेळाव्यात व्यक्त करण्यात आला. या मेळाव्यात हिंदुस्थान माथाडी अॅण्ड जनरल कामगार सेना, ग्राहक सेना, हिंद भारतीय कामगार सेना, महाराष्ट्र वाहतूक सेना, शिव विधी व न्याय सेना, रेल्वे कामगार सेना, स्थानीय लोकाधिकार समिती, शिव आरोग्य सेना, रिक्षाचालक- मालक सेना, अंगणवाडी सेविका, महिला बचतगट आदी संघटना सहभागी झाल्या होत्या.

वसई विधानसभा संघटक विनायक निकम, माजी ग्राहक जिल्हा कक्ष अधिकारी शंकर बने यांनी मेळाव्याचे आयोजन केले होते. अॅड. भरत पाटील, किशोर पाटील, संगीता सुर्वे, मिलिंद खानोलकर यांची भाषणे झाली. निवडून आल्यानंतर आपण समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही भारती कामडी यांनी दिली. यावेळी पालघर जिल्हाप्रमुख पंकज देशमुख, जिल्हा संघटक किरण चेंदवणकर, विवेक पाटील, नितीन रावकर, जनार्दन म्हात्रे, प्रवीण म्हाप्रळकर, हरिहर पाटील, सिद्धेश जोगळे, सुनील मुळ्ये, भक्ती दांडेकर, अनिता राणे, प्रमिला कामत, राधेश्याम पाठक, उदय चेंदवणकर, बाबुलाल राजभर, मंगेश चव्हाण, शिव आरोग्य सेनेचे चिमण सोलंकी, जितू हजारे, अजित वैती, अग्नेलो दोडती, जाशिंथा फिंच, चरणा म्हात्रे, शीला लष्करे, शिवदूत सुभाष विचारे, सचिन परब, गणेश पाटकर, किशोर काजरेकर, सुरेश भोगले, विजय शर्मा, आदित्य गावडे आदी उपस्थित होते.