मधुचंद्राच्या रात्री नवऱ्याने गोळ्या खाल्ल्या, नववधूची तब्येत बिघडली; लग्नाच्या सातव्या दिवशी मृत्यू

उत्तरप्रदेशातील हमीरपूरमध्ये एक अनोखे प्रकरण समोर आले आहे. सात दिवसापूर्वी लग्न झालेल्या तरुणाने मधुचंद्राच्या रात्री सेक्सवर्धक गोळ्या खाल्ल्या आणि आपली हवस पूर्ण करण्यासाठी बायकोसोबत संबंध करुन  पूर्णपणे जखमी केले. त्यानंतर नवविवाहितेची तब्येत बिघडली आणि अवघ्या सात दिवसात तिचा मृत्यू झाला. आता नवविवाहितेच्या भावाने तिच्या सासरच्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

हमीरपूर येथे राहणाऱ्या तरुणीचे 3 फेब्रुवारी रोजी लग्न झाले. तरुणीला आई-वडिल नसल्याने तिचा भाऊच तिच्यासाठी सर्वकाही असून तो सरकारी कर्मचारी आहे.. तरुणीच्या वहिनीने सांगितले की, 7 फेब्रुवारीला ती तिच्या पतीसोबत कानपूरला एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी गेली होती, तेव्हा तिला तिच्या नणंदेच्या सासरचा फोन आला आणि त्यांनी आरोप केला की, तुमची मुलीच्या आजारपणाबाबत लपवले. तिला उलट्या होत असून ती आजारी आहे. वहिनीच्या म्हणण्यानुसार, ते कानपूरमधील लग्न सोडून त्याच दिवशी ओराईला पोहोचले, तेथून त्यांनी आपल्या नणंदेला घेऊन थेट कानपूरमधील एका खाजगी नर्सिंग होममध्ये दाखल केले. जिथे तिच्यावर उपचार करण्यात आला. पण त्याचा काहीएक उपयोग झाला नाही.

नववधूच्या वहिनीने पुढे सांगितले की, तिच्या नणंदेने तिची तब्येत बरी नसल्याचे फोनवरून सांगितले होते. पण त्याचबरोबर तिची प्रकृती का बिघडली हेही सांगितले. नणंदेच्या नवऱ्याने सेक्सवर्धक गोळ्या घेतल्या होत्या. त्यानंतर तिची तब्येत बिघडली. यानंतर तिने स्त्रीरोग तज्ज्ञांना दाखविले. तपासणीनंतर स्त्रीरोग तज्ज्ञांनी सांगितले की, तिच्यासोबत सामूहिक बलात्कार केल्यासारखे संबंध केले होते. त्यामुळे तिला अंतर्गत जखमा झाल्या होत्या. त्याचा संसर्ग पसरला आणि 10 फेब्रुवारी रोजी दुपारी 3.30 वाजता कानपूरमध्ये तिचा मृत्यू झाला, मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर सोमवारी मृतदेह घरी पोहोचल्यावर एकच गोंधळ उडाला. मृताच्या भावाने सासरच्यांविरोधात तक्रार करणार असल्याचे सांगितले. कोतवाल अनूप सिंह यांनी सांगितले की, संपूर्ण घटना ओराई येथे घडली. आतापर्यंत येथे कोणीही तक्रार दिलेली नाही.