मोदी-शाह सत्तेत परतले तर लोकशाही संपलीच समजा – मल्लिकार्जून खरगे

मोदी-शहा सरकार जर सत्तेवर परतले तर देशातील लोकशाही संपली म्हणूनच समजा, असा जोरदार हल्ला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर रविवारी येथे चढवला. राज्यघटनाही ते निकालात काढतील, असे ते म्हणाले.

महिला, मजूर आणि शेतकऱयांचा मतदानाचा अधिकार तुम्हाला शाबूत ठेवायचा असेल, तर काँग्रेस आणि त्यांच्या हात या पक्षचिन्हाला मतदान करा,’ असे आवाहन त्यांनी सतना येथील मतदारांना केले. सतना लोकसभेसाठी दुसऱया टप्प्यात 26 एप्रिलला मतदान होणार आहे. येथे काँग्रेस उमेदवार सिद्धार्थ कुशवाह लढत आहेत.