अजय बारसकर गद्दारच, सरकारने त्याचा दूत म्हणून वापर करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला, मराठा क्रांती मोर्चाचा आरोप

अजय उर्फ खंडू महाराज बारसकर हा हेकेखोर आहे, खंडणी गोळा करणे, खोटे बोलणे ब्लॅकमेलिंग करून आपली उपजीविका चालवण्यासाठी हा काही ना काही उद्योग सातत्याने करत असतो ब्लॅकमेलिंग करण्याचा हा त्याचा धंदा आहे, हा महाराज नसून हा गद्दार आहे. याच्या गद्दारीचा शिक्का आता पुसला जाणार नाही असे म्हणून याच्या विरोधामध्ये आम्ही कारवाई करणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चाचे गजेंद्र दांगट ,निलेश सुंबे ,विशाल घोलप यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली. याच बारसकराच्या माध्यमातून सरकारने त्याचा दूत म्हणून वापर करून मराठ्यांचे आंदोलन हे चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला आहे, असा गंभीर आरोप सुद्धा त्यांनी यावेळी केला.

मराठा आरक्षण च्या संदर्भामध्ये जो काही विषय अजय महाराज बारसकर यांचा पुढे आला त्याच्यावर आज येथील मराठा क्रांती मोर्चाने आपली भूमिका स्पष्ट केली. अजय उर्फ खंडू हा महाराज नाही याला कोणीही महाराज म्हणून बोलवत नाही, यांनी नगरमध्ये आजपर्यंत एकही कीर्तन केलेले नाही. समाजामध्ये विष पेरण्याचं काम त्याने सातत्याने केले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. याचा चेहरा हा वेगळा आहे. स्वतःची पोळी भाजण्यासाठी त्याने आतापर्यंत अनेक गोष्टी केलेल्या आहे. शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून अधिकाऱ्यांची तक्रार करून त्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रकार सुद्धा त्याने केलेला आहे. समाजामध्ये याला कोणतेही प्रकारे किंमत नाही. मराठा क्रांती मोर्चाच्या वेळेला सुद्धा याने जे जे काही प्रकार केलेले आहेत ते आम्ही सर्व जरांगेपाटील यांना सांगितलेले आहे, त्यामुळे गेल्या दोन महिन्यापासून त्याला आम्ही बाजूला ठेवले असल्याचेही दांगट यांनी यावेळी केला.

महाराज जारांगेच्या टीम मध्ये नव्हता, सरकारने पाठवलेला दूत होता

अजय महाराज हा जरांगे पाटलांच्या टीम मध्ये नव्हता, हे सगळ्यांना माहिती आहे तो कोणत्याही प्रक्रियेमध्ये नव्हता काही ना काही निमित्त काढून तो त्यांना भेटायला जायचा व तेथे त्याची ओळख तो सांगायचा जर त्याला सगळेच ओळखत होते तर त्याला प्रत्येक वेळेला आपली ओळख का सांगावी लागली असा सवाल सुद्धा दांगट यांनी यावेळी उपस्थित केला. हा महाराज नाही हा विकला गेलेला आहे असा आरोप सुद्धा त्यांनी यावेळी केला. राज्य सरकारने मराठ्यांचे आंदोलन हे यशस्वी होऊ नये त्यामुळे अजय महाराजाचा दूत म्हणून वापर करून मराठ्यांनाच मराठ्यांच्या अंगावर सोडण्याचे पाप या राज्य सरकारने केलं आहे.

हा मराठ्यांचा गद्दार

अजय महाराज हा एका मोठ्या नेत्या बरोबर चार-पाच दिवसापूर्वी हेलिकॉप्टर मधून तो कोणासमोर आला हे आता उघड व्हायला पाहिजे तो समाजाच्या विरोधामध्ये गेलेला आहे. हा मराठ्यांच्या विरोधातला गद्दार म्हणूनच आता त्याच्या कपाळावर शिक्का लागलेला आहे. त्याला नगर मध्ये कोणी विचारत नाही आता तो प्रसिद्धीसाठी अशा प्रकारचे कृत्य करत आहे व त्याला सत्ताधाऱ्यांची साथ आहे असा आरोप सुद्धा यावेळी केला. जर त्याला मराठ्यांच्या बद्दल एवढा कळवळा होता तर त्याने स्वतंत्र असा निर्णय घेऊन आंदोलन कधी केले आहे का? ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान झाला त्यावेळी चिद्दाम विरोधामध्ये त्याने काही शब्द तरी बोलला का मग त्यावेळेस त्यांनी विरोध का केला नाही असे दांगट म्हणाले.

मराठ्यांचे आंदोलन गद्दार मराठा थांबवू शकतो

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी स्वराज्य पाटील यांनी आंदोलन चालू केले व त्याला समाजाने पाठिंबा दिला सरकारने दिलेल्या शब्द पाळला नाही म्हणून त्यांनी पुढची भूमिका जाहीर केली मराठ्यांचे आंदोलन गद्दार मराठाच हा थांबू शकतो व त्यांनी अजय महाराज बारसकर यांच्या माध्यमातून हे आंदोलन थांबवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे असा आरोप सुद्धा यावेळी केला.

यावेळी निलेश सुबे यांनी, प्रसिद्धी मिळवण्यासाठी अजय महाराज हा वेगवेगळ्या स्तराला पोहोचलेला आहे तो कुठल्याही सामाजिक कार्यामध्ये नाही मराठा समाजामध्ये त्याचे कोणत्या प्रकारचे योगदान नाही, असा आरोप त्यांनी केला संभाजी ब्रिगेड मध्ये असताना देखील सुद्धा त्यांनी अशाच प्रकारचे कटकारस्थान केले हा त्याचा इतिहास आहे सुपाऱ्या घेण्याचं काम याने केलं आहे असे ते म्हणाले. तर विशाल घोलप यांनी तो महाराज नाही तो नीच माणूस आहे हा सुधारलेला नाही तो खाकी कपडे घालून यापूर्वी लोकांची लोटमार करायचा त्याच्या भागामध्ये तो राहतो येथे सुद्धा तो अतिक्रमण करतो त्याचं राहतं घर सुद्धा अतिक्रमणामध्ये आहे असे ते म्हणाले. तो ज्या भागात राहतो त्या एका अल्पवयीन मुलीला त्याने छेडछाड केलेली आहे त्याने हाता पाया पडून हा प्रकार मिटून घेतलेला आहे अशा गंभीर बाबी सुद्धा आहे असे ते म्हणाले.