रत्नागिरी शहरातील तीनही तलाठी पदे रिक्त, पर्यायी व्यवस्था करा: रत्नागिरी काँग्रेसची मागणी

रत्नागिरी शहरातील तलाठ्यांची तीनही पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे विद्यार्थी, पालकांसह ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. या संदर्भात रत्नागिरी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन नागरीकांची गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी व्यवस्था करा अशी मागणी करण्यात आली आहे.
तलाठी पदे रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक दाखल्यांपासून वंचित राहावे लागत आहे. तसेच शेतकरी आणि नागरीकांची तलाठी नसल्यामुळे गैरसोय होत आहे. ही समस्या कॉंग्रेसच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडण्यात आली. यावेळी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष हारिस शेकासन, शहराध्यक्ष रमेश शहा, उपाध्यक्ष रफिक मुल्ला, शाहरुख वागले, आतिफ साखरकर, सुहेल भाटकर उपस्थित होते. पुढील दोन दिवसात पर्यायी व्यवस्था करु असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.